Monday, November 15, 2010

सांगलीत मराठा साहित्य संमेलन उत्साहात पार पडले....


वाचन अभिरूची वाढवण्यानेच मराठय़ांचा विकास -इंगोले


सांगली, १४ नोव्हेंबर/प्रतिनिधी
मराठय़ांचा सर्वागीण विकास वाचन अभिरूची वाढविल्यानेच होणार असून, लेखनयज्ञात सर्व मराठय़ांनी सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन करून अन्यायाविरुद्ध कळीकाळाचे रूप मराठय़ांनाच घ्यावे लागणार असल्याने अभंग विश्वास व एकजुटीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सांगलीतील ७ व्या मराठा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिमा इंगोले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्योगपती शहाजी जगदाळे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने ७ व्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या उद्घाटन समारंभास मराठा सेवा संघाचे संस्थापक अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर, सांगलीचे महापौर प्रा. नितीन सावगावे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष मोहनराव कदम, एकनाथ सरडे, वसंतराव सोनवणे, प्रा. दिलीप चौधरी, रेखा खेडेकर, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमा ढवळे, देवानंदजी कापसे आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष जैमिनी कडू यांनी ७ व्या मराठा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. प्रतिमा इंगोले यांच्याकडे प्रदान केली. प्रारंभी स्वागतगीत, जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उद्घाटक शहाजी जगदाळे यांच्या हस्ते विचारपीठावरील विद्युत दीपस्तंभ कळ दाबून प्रज्वलित करण्यात आला. स्वागताध्यक्ष श्यामराव पाटील यांनी स्वागत केले. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. साहेब खंदारे यांनी प्रास्ताविकात साहित्य परिषद व साहित्य संमेलनाची भूमिका विशद केली.
प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून यश मिळविण्यासाठी विचारांची गरज असते. ते विचार मिळविण्यासाठी मराठा साहित्य संमेलनाच्या माध्यमाचीही आवश्यकता आहे. विचारांची कास धरल्याशिवाय जागतिक प्रवाहात प्रगती साधता येणे अशक्य आहे, असे विचार उद्घाटक शहाजी जगदाळे यांनी मांडले.
या साहित्य संमेलनातूनच नवा तुकाराम जन्माला येणार आहे. सांगलीत झालेल्या ८१ व्या अखिल भारतीय संमेलनाचे साधे निमंत्रणही मला मिळाले नव्हते, मात्र याच सांगलीत ७ व्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले, याचा मला अभिमान वाटतो. बाईनेच का दळायचं? एखाद्या दिवशी नवऱ्याने दळले तर काय बिघडले. शेतकऱ्यांना सर्वानी कष्टाचे मोल म्हणून हातभार लावायला हवा, तरच शेती व्यवसाय टिकू शकेल. तो जर नष्ट झाला तर अन्नधान्याच्या पर्यायी व्यवस्थेचे काय, असा सवाल उपस्थित करून प्रतिमा इंगोले यांनी जीवनसत्त्वाच्या गोळ्या घेऊन माणूस तगू शकणार नाही. अन्नब्रम्हाची तृप्ती मिळणार नाही व मानव दानव झाल्याशिवाय राहणार नाही, अशी खंत व्यक्त केली. मराठय़ांचा खरा व्यवसाय शेती हा आहे. मुळातच तो भूदेव, कारण तो अन्न पिकवून सगळ्यांना खाऊ घालतो. पालनपोषणाचे कार्य करतो, म्हणून तो श्रेष्ठ आहे, असे प्रतिमा इंगोले यांनी सांगितले.
साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. साहित्य संमेलनाची स्मरणिका पेरणी-संपादक जे. बी. शिंदे, कुळवाडी भूषण-सीताराम काकडे, संशोधक-बापूराव ढोंगे, पुराणातील गमतीजमती व वास्तव दर्शन-हिंमतराव मोरे, माझी शाळा-आप्पासाहेब मगर, थोडं खाजवा की, शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पुणे लुटणारा व जाळणारा आदिलशहाचा प्रामाणिक नोकर दादोजी कोंडदेव या पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
मराठा साहित्याचे समांतर प्रवाह, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, मराठा लोकतत्त्व आणि भाषा, बदलती समाजव्यवस्था-शेतकरी आणि मराठा साहित्य या विषयांवर दिवसभरात परिसवांद पार पडले. यामध्ये चंद्रशेखर शिखरे, टेक्सास गायकवाड, डॉ. रावसाहेब पाटील, वाहरू सोनवणे, प्रा. फक्रुद्दीन बेन्नुरे, डॉ. बाबुराव गुरव, डॉ. नवनाथ मोरे, डॉ. शरद गायकवाड, सदानंद देशमुख, भास्कर चंदनशिव, मनीषा पाटील यांनी सहभाग घेतला.








संमेलनातील ठराव

संमेलनातील ठराव
0 लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवा
0 कर्नाटकसह सर्व राज्यांतील सीमावाद तातडीने सोडवा
0 राज्यात होणाऱ्या सर्व साहित्य संमेलनांना अनुदान द्या
0 साहित्यिकांना समाज पायाभूत धरून गौरवावे
0 बेंद्रे लिखित "विचिकित्सक शिवकालाच्या इतिहास' ग्रंथ-खंडाचे पुनःप्रकाशन व्हावे
0 शासकीय आदेश लोकभाषेत प्रकाशित व्हावीत

मराठा समाजाला आरक्षण द्यावे
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 15, 2010 AT 12:15 AM (IST)

सांगली, (क्षात्रवीर संभाजीराजे नगरी) - मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करणारा ठराव आज येथे सातव्या मराठा साहित्य संमेलनात संमत करण्यात आला. दोन दिवसांच्या संमेलनाच्या समारोप सत्रात विविध ठराव करण्यात आले. मराठा साहित्यकांनी समाजाला पुढे नेणारे साहित्य निर्माण करावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. समारोप सत्रात मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी संघाच्या वाटचालीबाबत दिशादिग्दर्शन केले.

ते म्हणाले,""मराठा शूद्रच आहेत. त्यांची वाटचाल अतिशूद्रतेकडे सुरू आहे. अशा संमेलनातून मराठा समाजाला दिशा देणारे साहित्य पुढे यावे. नकाराचे नव्हे तर विद्रोहाचे साहित्य यावे. मराठा समाजातल्या शिकलेल्यांना समज यावी, यासाठीच सेवा संघाची धडपड आहे. आम्ही ब्राह्मणविरोधी बोलतो असे आजवर म्हटले जायचे. मात्र, या म्हणण्याला एकाही ब्राह्मणाचा आक्षेप नाही. आमच्यावर टीका करणारे सर्व आमचेच आहेत. प्रश्‍न आमच्या विरोधाचा नाही. तर, आम्ही काय चुकीचे बोलतो? याचा आहे.''

माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले,""मराठा समाजाने आत्मचिंतन करून वाटचाल करावी. कमी शिक्षणप्रसार, अंधश्रद्धाळूपणा, व्यसनांधता ही समाजापुढची आव्हाने आहेत. स्त्रियांना उबंरठ्याबाहेर आणून त्यांच्या हाती आर्थिक सूत्रे देण्यासाठी समाजाने पाऊल टाकावे.''

संमेलनाध्यक्षा प्रतिमा इंगोले म्हणाल्या,""सूर्याच्याही पुढे जाणारे सत्य शोधण्यासाठी मराठा समाजाने पुढे यावे. साहित्य उन्नतीकडे नेते. तसे लेखन करण्यासाठी सेवा संघाच्या माध्यामातून प्रयत्न व्हावेत.''

व्यासपीठावर साहित्य परिषदेच्या जिल्हा प्रमुख निर्मला पाटील, शामराव पाटील, प्राचार्य पी. बी. पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे उपस्थित होते. अपर्णा खांडेकर यांनी आभार मानले।

ब्राह्मणांनो, आता माणसात या
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 15, 2010 AT 12:00 AM (IST)

सांगली - सत्ता, संपत्ती आणि विद्येचा अधिकार केवळ ब्राह्मणांना आणि कष्ट व सेवा क्षुद्रांनी करायची, असा विचार मांडणाऱ्या द्विवर्णवादी ब्राह्मणांनो, आता माणसांत या. जन्माधिष्ठित उच्च-निच्चतेची वागणूक चुकीची आहे हे एकदाचे जाहीर करा. गुणधर्मावर आधारित समाज उभा करूया, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी आज येथे केले. येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात सुरू असलेल्या सातव्या अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनात डॉ. मोहन पाटील यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यात त्यांनी शांतिनिकेतनची उभारणी, जमिनी खरेदी, आमदारकीचे तिकीट, बदलते शैक्षणिक धोरण, समाजवाद यावर परखड मते व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी येथे जानेवारीत होऊ घातलेल्या अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण अधिवेशनाच्या आयोजकांना उद्देशून त्यांना माणसांत येण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले, ""राज्यात अनेक प्रकारची साहित्य संमेलने कशासाठी, असा प्रश्‍न काही ठिकाणी उपस्थित केला जातो. आम्हाला तर कुठे हवी आहेत ती. एकच झाले तर नकार कुणाचा आहे. पण, आधी जातीची उतरंड खाली आणा. ती अजून घट्ट आहे. त्याने ब्राह्मणेतरांची तोंडे झाकली आहेत. सर्वांत वर बसलेलं ब्राह्मणरूपी बुंडुकल खाली यायचं नाव घेत नाही. त्यांनी खाली यावं, सर्वांनी आपापल्या आकारानुसार पंगत करावी. गुणधर्मावर आधारित समाज उभा करण्याची प्रक्रिया सुरू करूया. त्यासाठी अमानुष वर्णवाद सोडला पाहिजे. सत्ता, विद्या, संपत्ती आणि श्रमाचे सार्वत्रिकरण आणि विकेंद्रीकरण हाच खरा समाजवाद आहे.''

ते म्हणाले,""शैक्षणिक पद्धती अतिशय वाईट दिशेने निघाली आहे. ना शिकणारा पूर्णवेळ आहे ना शिकवणारा. प्राध्यापक कामगार आणि संस्थाचालक मालक झाले आहेत. येथे सारा होलसेल-रिटेलचा बाजार मांडला आहे.''

ते राजकारणच होते
शांतिनिकेतन मोडण्यासाठीही अनेकांनी प्रयत्न केले. वसंतदादांनी मला आमदारकीचे तिकीट दिल्याने त्यांचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी प्राध्यापकांच्या सहाय्याने तो डाव रचला. पदवीचे शिक्षण देणारा विभाग बंद करावा लागला. शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. हे एक प्रकारचे राजकारणच होते.''

प्राचार्य म्हणाले...
* मराठ्यांनी व्हिजन ठरवावं
* व्हिजनप्रमाणे नियोजन व्हावं
* भारतीय राज्यघटनेचा विसर पडलाय
* भारतीय राज्यपद्धती ब्रिटिशकालीन
* पहिलीपासून इंग्रजी नको
* आधी मातृभाषा पक्की करा
* शिक्षणशास्त्राप्रमाणे मुलांचे संगोपनशास्त्र शिका
* शांतिनिकेतनची जागा कष्टाने मिळवली
* नगरपालिकेने गॅझेट करूनही 50 एकर जागा दिली नाही


मराठा संमेलनात रंगले "मनोरंजनातून प्रबोधन'
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 15, 2010 AT 12:00 AM (IST)

सांगली - अंधश्रद्धेतून होणाऱ्या फसवणुकीचे उच्चाटन करणारी नाटिका, तुकाराम महाराजांचा पोवाडा, संभाजीराजे यांची शौर्यगाथा, अण्णा भाऊ साठे यांची लावणी व जिजाऊ यांच्या जीवनावरील एकपात्री प्रयोगाने सातव्या अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनातील सकाळचे सत्र रंगले. "मनोरंजनातून प्रबोधन' कार्यक्रमात जिल्ह्यातील कलाकारांनी विविध लोककलांच्या दर्शनातून खळखळून तर हासवलेच पण तितकेच अंतर्मुखही केले.

नागठाणे (ता. पलूस) येथील बालगंधर्व सांस्कृतिक मंचने सादर केलेली "दुर्ग्या देवर्षी' नाटिकेने रसिकांना खळखळून तर हासवलेच पण फसवणुकीला बळी न पडण्याचा संदेश दिला. भोंदूबाबा अंगात आणण्याचे कसे नाटक करून देवीच्या नावाखाली कसे सर्वसामान्यांना लुटतो. त्याची भोंदूगिरी व फसवणूक अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पोलिस सापळा रचून कसे हाणून पाडतात हे दाखवले. लोकांनी कसल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन या नाटिकेतून करण्यात आले.

अरुण कापसे यांनी लेखन व दिग्दर्शन केले, तर राजेंद्र जाधव, बाळकृष्ण फार्णे, जितेंद्र जाधव, सोमनाथ बामणे, अनिल पखाले यांनी अभिनय केला. शाहीर राजा पाटील यांनी "तुका वैकुंठाला जातो का?' हा पोवाडा सादर केला. तुकोबा वैकुंठाला गेले नाहीत तर देहूगावातील ब्राह्मणांनी त्यांची हत्या केल्याचे त्यांनी पोवाड्यातून सांगितले. विक्रम शिरतोडे याने "माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली' या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लावणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्नेहा कदम यांनी एकपात्री प्रयोगातून राजमाता जिजाऊ यांचे चरित्र उलगडले. जिजाऊ यांच्या जीवनातील अनेक धकाधकीचे प्रसंग, त्यांची राज्य स्थापण्याची आकांक्षा, शिवाजीराजेंना घडवणे, मोगलाईच्या काळातील जिजाबाई यांची मानसिकता दाखवली. वरद महिला भजी मंडळाने तुकोबांची भजने सादर केली. स्नेहल लवंड हिने छात्रवीर संभाजीराजे यांची जीवनगाथा, कर्तृत्वगाथा सांगणारे विचार सांगितले.

Sunday, November 14, 2010

मराठा शब्द प्रांतवाचक; संमेलनाचीही तीच भूमिका
सकाळ वृत्तसेवा
Friday, November 12, 2010 AT 12:15 AM (IST)

सांगली - येथे शुक्रवार(ता. 12) पासून तीन दिवस शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या प्रांगणात 7 वे मराठा साहित्य संमेलन होत आहे. जगद्‌गुरू तुकोबाराय परिषदेचे पश्‍चिम महाराष्ट्रात होणारे हे पहिलेचे संमेलन. त्याच्या अध्यक्षा डॉ. प्रतिमा इंगोले यांनी "सकाळ'जवळ मांडलेली व्यापक भूमिका...

छोटी छोटी संमेलने अटळ, अपरिहार्य - प्रतिमा इंगोले
""आपल्या समाजाचे जात वास्तव विचारात घेतले तर मराठा संमेलनासारखी छोटी छोटी संमेलने ही अटळ आणि अपरिहार्य बाब ठरते; मात्र कोणतेही साहित्य समाजाला उन्नतच करते. साहित्याचा मेळा कोणत्या ना कोणत्या निमित्ताने व्हावा. विचारांचे आदान-प्रदान व्हावे. त्यातून सत्य पुढे यावे. मुळात मराठा शब्द जातवाचक नाही. प्रांतवाचक वा प्रवृत्तीवाचक आहे. तीच व्यापक भूमिका जगद्‌गुरू तुकोबाराय परिषदेची आहे. या संमेलनाची भूमिकाही समाजाला पुढे घेऊन जाणारीच राहील.'' असा आशावाद सातव्या मराठा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. प्रतिमा इंगोले यांनी व्यक्त केला. त्यांच्याशी झालेली प्रश्‍नोत्तरे...

प्रश्‍न - जातीच्या संमेलनाची खरेच आवश्‍यकता आहे का?
उत्तर - जातीचे मेळावे होतात. राजकीय मागण्या केल्या जातात. त्याचवेळी जातीच्या नावावर साहित्याचा उत्सव झाला तर समाजविघातक असे काहीच घडणार नाही. लोक एकत्र येतील. चर्चा करतील. साहित्य सर्वांना सोबत घेऊन जाण्याचाच संदेश देते. अनेक बऱ्या-वाईट गोष्टींबाबतची चर्चा होऊन त्यातून संशोधनाला चालना मिळेल. त्यातूनच संस्कृतीचे संवर्धन होत असते. प्रत्येकीला लता मंगेशकरांसारखे गाता येणार नाही; मात्र एखादी गृहिणी चांगले गात असेल आणि तिच्या गाण्यातून कुटुंबाला चार घटका आनंद मिळत असेल तर ते गाणं चांगले नाही का?

प्रश्‍न - अखिल भारतीय साहित्य संमेलनापासून इतर विविध संमेलनांशी मराठा संमेलनाचे नाते कोणते?
उत्तर - छोटी संमेलने साहित्यनिर्मितीची ऊर्मी तयार करण्यासाठी पूरकच ठरतात. मुळात मराठा संमेलन हे जातीचे संमेलन आहे, असा समजच चुकीचा आहे; कारण मराठा शब्द जातवाचक नसून प्रांतवाचक, प्रवृत्तीवाचक आहे. मराठा आणि महाराष्ट्राची व्युत्पती शोधताना हे सिद्ध होते. जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेची हीच भूमिका आहे. विविध साहित्य प्रवाहांना सोबत घेऊन त्यांचे अस्तित्व मान्य करूनच पुढे जाण्याची परिषदेची भूमिका आहे.

प्रश्‍न - मराठा संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारताना तुमची भूमिका कोणती आहे?
उत्तर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 84 वर्षांच्या वाटचालीत अवघ्या चार महिलांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. तुकोबाराय साहित्य परिषदेने मात्र सातव्या संमेलनातच एका स्त्रीकडे अध्यक्षपद सोपवले ही बाब मला महत्त्वाची वाटते. अर्थात, मी खूप मोठी साहित्यनिर्मिती केली असा दावा नाही; मात्र मी ज्या वास्तववादी जाणिवेने लिहिते, सामान्यांच्या प्रेरणा व्यक्त करते, त्या सर्व समाजघटकांची प्रतिनिधी म्हणून मला ही संधी दिली असावी. सांगलीच्या 81 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या हस्ते झाले. या संमेलनाला मला निमंत्रण नव्हते. त्याचा मनात किंतू नाही; मात्र साहित्यरसिक म्हणून मी संमेलनाला हजर होते. आता सांगलीत अध्यक्ष म्हणून हजर राहण्याची संधी मिळते तर ती घ्यावी. माझ्यासारख्या अनेकांनी लिहिते व्हावे, या हेतूने मी या संमेलनाला उपस्थित राहते आहे.

प्रश्‍न - मराठी भाषेच्या व्युत्पत्तीबद्दलचे संशोधन आपण पुढे आणले आहे. त्या बद्दल सांगा?
उत्तर - संस्कृतपासून मराठीची व्युत्पत्ती झाल्याचे मानल्याने आजवर अनेक गोंधळ झाले. त्यामुळे अनेक मराठी शब्दाची व्युत्पत्ती शोधण्यासाठी दक्षिणेतील भाषांकडे जावे लागते. माझ्या मते हा अट्टहास सोडला पाहिजे. त्यातून चुकीचे पायंडे पडत गेले. देशी भाषांचे अस्तित्व शोधताना आपल्याला अनेक शब्दांची उकल होत जाते. महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती शोधताना अकराव्या शतकात चक्रधरांच्या महानुभव ग्रंथातील उल्लेखापर्यंत आपण पोहोचतो. तिथे महाराष्ट्री असा उल्लेख आहे; मात्र महाराठ शब्दापासून महाराष्ट्री शब्द आल्याचे दिसते. महानुभवाच्या आधी शंभर वर्षे महाराठ हा शब्द वऱ्हाडात प्रचलित होता. राठ म्हणजे कठीण, महाराष्ट्र भूमी कठीण दगडांची म्हणून महाराठ शब्द आला. महाराठ प्रांतातील सारेच मराठा. देशी भाषांच्या संशोधनातून अनेक गोष्टी पुढे येत आहेत. लोकभाषांना तुच्छ लेखण्याचे अनेक दुष्परिणाम संशोधनातून सिद्ध झाले आहेत. अध्यक्षीय भाषणात मी याचा सविस्तर उल्लेख केला आहे.

Saturday, November 13, 2010

अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन . सांगली

'शांतिनिकेतन'मध्ये मराठा साहित्यसंमेलन सुरू...
सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 13, 2010 AT 06:09 PM (IST)

सांगली (क्षात्रवीर संभाजीराजे नगरी) - मराठी भाषेच्या व्युत्पत्तीचा शोध संस्कृत किंवा दक्षिण भाषेच्या घेण्यातून चुकीचा इतिहास प्रचलित झाला. चुकीचे पायंडे पडत गेले, असे मत सातव्या मराठा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. प्रतिमा इंगोले यांनी व्यक्त केले. शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या परिसरात सुरू झालेल्या या संमेलनाचे उद्‌घाटन उद्योजक शहाजीराव जगदाळे यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, प्राचार्य पी. बी. पाटील, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.

वऱ्हाडी लोकभाषेच्या अभ्यासक डॉ. इंगोले यांनी अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेच्या व्युत्पत्तीबद्दल काही महत्त्वाची विधाने केली. त्या म्हणाल्या, ""मराठी भाषेच्या संशोधनात भाषाशास्त्रज्ञांनी केलेले अनेक घोटाळे निस्तरावे लागत आहेत. "राकट देशा कणखर देशा महाराष्ट्र देशा' असे महाराष्ट्राचे वर्णन असलेल्या महाराष्ट्राचा एका लोकगीतात महाराठ असा उल्लेख आहे. राठ म्हणजे कणखर. हा वऱ्हाडी शब्द आहे. वऱ्हाडीची आद्य पूर्व भाषा देशी होती. तिलाच महाराष्ट्री अथवा अपभ्रंश भाषा असे अभ्यासक म्हणतात. या वरून मराठीची निर्मिती संस्कृतपासून नव्हे तर वऱ्हाडीच्या आद्यभाषेपासून झाली आहे. याचे अनेक पुरावे महानुभव वाङ्‌मयात सापडतात. साहित्यनिर्मितीने भाषेला स्थिरता येते. अनेक शिलालेख व त्यावरील उल्लेखांवरून हेच पुढे येते. मराठीची व्युत्पत्ती सोपी आहे. आमचे भाषापंडित गावाला वळसा घालत तिचे मूळ शोधण्यासाठी तामिळ भाषेकडे जातात. कोणत्याही शब्दाची व्युत्पत्ती संस्कृतमधून शोधतात; कारण त्यांना मराठीची व्युत्पत्ती त्याच भाषेत शोधायची असते. मुळात भाषा आधी आणि नंतर भाषाशास्त्र येते. बोली आधी आधी नंतर प्रमाण भाषा येते. ते मानले नाही तर भाषाशास्त्रच शुद्ध वाटायला लागते. हा प्रकार उलटी गंगा नेण्याचा आहे. आम्ही म्हणू तेच खरे असे बिंबवण्याचा आहे.''

उद्‌घाटक श्री. जगदाळे म्हणाले, ""मी ज्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलो. त्या आणि माझ्या सर्व नातलगांच्या आयुष्याचा मी भौतिक दृष्टीने विचार करतो; तेव्हा मला अनेक फरकाचे मुद्दे आढळतात. विचारांची कास धरली तरच स्वतःमध्ये बदल होतो. जागतिकीकरणाच्या परिस्थितीत आपल्याला ती गती पकडावी लागेल. साहित्य विचारांची प्रक्रिया गतिमान करते, असे आपण मानत असू तर या बदलाचे प्रतिबिंब साहित्यात हवे. आपल्याला ती गती पकडावीच लागेल. इंडिया आणि भारत हा फरक वाढतो आहे. तो दूर करणारा विचार साहित्याने द्यावा. नावेशिवाय पाण्यातला प्रवास नाही; मात्र पाणी नावेत आले तर प्रवासच नाही. याच सूत्राने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेकडे पहायला हवे.''

जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेची भूमिका मांडताना प्रदेशाध्यक्ष साहेबराव खंदारे म्हणाले, ""आम्ही सर्व साहित्यप्रवाहांचे स्वागत करतो. मराठा या शब्दाकडे आम्ही संकुचित भावनेने बघत नाही. विविध जातीसमूहांना त्यांच्या व्यवसायाने जात चिकटली. ती चिकटण्याआधी ते कोण होते? ते मरहट्ट प्रातांत राहत होते. म्हणून ते सारे मराठा होते. हरवत चाललेल्या लोकसंस्कृतीतील अनेक ठेव्यांचे जतन करण्याची परिषदेची भूमिका आहे. संस्कृतीचे भान ठेवण्याचा आणि ध्यान देण्याचा हा प्रयत्न आहे.''

राजारामबापू सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी स्वागत, जगद्‌गुरू तुकोराय साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. निर्मला पाटील यांनी प्रास्ताविक केले. हेमंत धुमाळ यांनी संमेलनाध्यक्षांचा परिचय करून दिला. छत्रपती संभाजीमहाराज (लेखक श्रीमंत कोकाटे), लोकराजे शिवराय, शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, थोडं खाजवा की (पुरुषोत्तम खेडेकर), थर्ड आय (ब्रिगेडियर सुधीर सावंत), कुळवाडी भूषण राजा शिवछत्रपती (सीताराम काकडे), संशोधन बाबूराव टोंगे, माझे बाबा (अप्पासाहेब मगर) या पुस्तकांचे प्रकाशन झाले. सहाव्या संमेलनाचे अध्यक्ष जैमिनी कडू यांनी नव्या अध्यक्षांकडे पदाची सूत्रे दिली.
जिजाऊ गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. मंचावर माजी आमदार एकनाथ साळवे, मोहनराव कदम, महापौर नितीन सावगावे, प्रवीण गायकवाड, जिजाऊ बिग्रेडच्या सीमा ढवळे आदींची उपस्थिती होती. नितीन चव्हाण, अर्चना चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. आर. एस. पवार यांनी आभार मानले. साहित्य परिषदेचे पदाधिकारी अपर्णा खांडेकर, ऋजुता माने, नामदेव भोसले, शुभांगी पाटील, तानाजीराव मोरे, अशोकराव सावंत, बाळासाहेब सावंत, ए. डी. पाटील, प्रदीप सूर्यवंशी, सुभाष सावंत, काका हलवाई, डॉ. संजय पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते संमेलनाच्या संयोजनात व्यस्त आहेत.

क्षणचित्रे
- शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचा परिसर महापुरुषांच्या प्रतिमांनी सजून गेला आहे.
- संमेलनस्थळी विचारपीठांना क्रांतिसिंह नाना पाटील, महात्मा चार्वाक, महात्मा फुले यांची नावे देण्यात आली आहेत.
- निमंत्रित महिला व पुरुष अशा सर्वांनीच केशरी फेटे परिधान केले होते.
- संमेलनाध्यक्ष प्रतिमा इंगोले यांनी फेट्यासह अध्यक्षीय भाषण वाचून दाखवले.
- जोराच्या पावसामुळे पुस्तक विक्रेत्यांची त्रेधा उडाली.
- संमेलनाच्या मार्गावर महाराष्ट्रातील थोर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत.
- पुरोगामी विचारांच्या लेखकांची पुस्तके मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी स्टॉलवर उपलब्ध आहेत.

अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन . सांगली

'शांतिनिकेतन'मध्ये मराठा साहित्यसंमेलन सुरू
सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 13, 2010 AT 06:09 PM (IST)

सांगली (क्षात्रवीर संभाजीराजे नगरी) - मराठी भाषेच्या व्युत्पत्तीचा शोध संस्कृत किंवा दक्षिण भाषेच्या घेण्यातून चुकीचा इतिहास प्रचलित झाला. चुकीचे पायंडे पडत गेले, असे मत सातव्या मराठा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. प्रतिमा इंगोले यांनी व्यक्त केले. शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या परिसरात सुरू झालेल्या या संमेलनाचे उद्‌घाटन उद्योजक शहाजीराव जगदाळे यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, प्राचार्य पी. बी. पाटील, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.

वऱ्हाडी लोकभाषेच्या अभ्यासक डॉ. इंगोले यांनी अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेच्या व्युत्पत्तीबद्दल काही महत्त्वाची विधाने केली. त्या म्हणाल्या, ""मराठी भाषेच्या संशोधनात भाषाशास्त्रज्ञांनी केलेले अनेक घोटाळे निस्तरावे लागत आहेत. "राकट देशा कणखर देशा महाराष्ट्र देशा' असे महाराष्ट्राचे वर्णन असलेल्या महाराष्ट्राचा एका लोकगीतात महाराठ असा उल्लेख आहे. राठ म्हणजे कणखर. हा वऱ्हाडी शब्द आहे. वऱ्हाडीची आद्य पूर्व भाषा देशी होती. तिलाच महाराष्ट्री अथवा अपभ्रंश भाषा असे अभ्यासक म्हणतात. या वरून मराठीची निर्मिती संस्कृतपासून नव्हे तर वऱ्हाडीच्या आद्यभाषेपासून झाली आहे. याचे अनेक पुरावे महानुभव वाङ्‌मयात सापडतात. साहित्यनिर्मितीने भाषेला स्थिरता येते. अनेक शिलालेख व त्यावरील उल्लेखांवरून हेच पुढे येते. मराठीची व्युत्पत्ती सोपी आहे. आमचे भाषापंडित गावाला वळसा घालत तिचे मूळ शोधण्यासाठी तामिळ भाषेकडे जातात. कोणत्याही शब्दाची व्युत्पत्ती संस्कृतमधून शोधतात; कारण त्यांना मराठीची व्युत्पत्ती त्याच भाषेत शोधायची असते. मुळात भाषा आधी आणि नंतर भाषाशास्त्र येते. बोली आधी आधी नंतर प्रमाण भाषा येते. ते मानले नाही तर भाषाशास्त्रच शुद्ध वाटायला लागते. हा प्रकार उलटी गंगा नेण्याचा आहे. आम्ही म्हणू तेच खरे असे बिंबवण्याचा आहे.''

उद्‌घाटक श्री. जगदाळे म्हणाले, ""मी ज्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलो. त्या आणि माझ्या सर्व नातलगांच्या आयुष्याचा मी भौतिक दृष्टीने विचार करतो; तेव्हा मला अनेक फरकाचे मुद्दे आढळतात. विचारांची कास धरली तरच स्वतःमध्ये बदल होतो. जागतिकीकरणाच्या परिस्थितीत आपल्याला ती गती पकडावी लागेल. साहित्य विचारांची प्रक्रिया गतिमान करते, असे आपण मानत असू तर या बदलाचे प्रतिबिंब साहित्यात हवे. आपल्याला ती गती पकडावीच लागेल. इंडिया आणि भारत हा फरक वाढतो आहे. तो दूर करणारा विचार साहित्याने द्यावा. नावेशिवाय पाण्यातला प्रवास नाही; मात्र पाणी नावेत आले तर प्रवासच नाही. याच सूत्राने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेकडे पहायला हवे.''

जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेची भूमिका मांडताना प्रदेशाध्यक्ष साहेबराव खंदारे म्हणाले, ""आम्ही सर्व साहित्यप्रवाहांचे स्वागत करतो. मराठा या शब्दाकडे आम्ही संकुचित भावनेने बघत नाही. विविध जातीसमूहांना त्यांच्या व्यवसायाने जात चिकटली. ती चिकटण्याआधी ते कोण होते? ते मरहट्ट प्रातांत राहत होते. म्हणून ते सारे मराठा होते. हरवत चाललेल्या लोकसंस्कृतीतील अनेक ठेव्यांचे जतन करण्याची परिषदेची भूमिका आहे. संस्कृतीचे भान ठेवण्याचा आणि ध्यान देण्याचा हा प्रयत्न आहे.''

राजारामबापू सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी स्वागत, जगद्‌गुरू तुकोराय साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. निर्मला पाटील यांनी प्रास्ताविक केले. हेमंत धुमाळ यांनी संमेलनाध्यक्षांचा परिचय करून दिला. छत्रपती संभाजीमहाराज (लेखक श्रीमंत कोकाटे), लोकराजे शिवराय, शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, थोडं खाजवा की (पुरुषोत्तम खेडेकर), थर्ड आय (ब्रिगेडियर सुधीर सावंत), कुळवाडी भूषण राजा शिवछत्रपती (सीताराम काकडे), संशोधन बाबूराव टोंगे, माझे बाबा (अप्पासाहेब मगर) या पुस्तकांचे प्रकाशन झाले. सहाव्या संमेलनाचे अध्यक्ष जैमिनी कडू यांनी नव्या अध्यक्षांकडे पदाची सूत्रे दिली.
जिजाऊ गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. मंचावर माजी आमदार एकनाथ साळवे, मोहनराव कदम, महापौर नितीन सावगावे, प्रवीण गायकवाड, जिजाऊ बिग्रेडच्या सीमा ढवळे आदींची उपस्थिती होती. नितीन चव्हाण, अर्चना चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. आर. एस. पवार यांनी आभार मानले. साहित्य परिषदेचे पदाधिकारी अपर्णा खांडेकर, ऋजुता माने, नामदेव भोसले, शुभांगी पाटील, तानाजीराव मोरे, अशोकराव सावंत, बाळासाहेब सावंत, ए. डी. पाटील, प्रदीप सूर्यवंशी, सुभाष सावंत, काका हलवाई, डॉ. संजय पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते संमेलनाच्या संयोजनात व्यस्त आहेत.

क्षणचित्रे
- शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचा परिसर महापुरुषांच्या प्रतिमांनी सजून गेला आहे.
- संमेलनस्थळी विचारपीठांना क्रांतिसिंह नाना पाटील, महात्मा चार्वाक, महात्मा फुले यांची नावे देण्यात आली आहेत.
- निमंत्रित महिला व पुरुष अशा सर्वांनीच केशरी फेटे परिधान केले होते.
- संमेलनाध्यक्ष प्रतिमा इंगोले यांनी फेट्यासह अध्यक्षीय भाषण वाचून दाखवले.
- जोराच्या पावसामुळे पुस्तक विक्रेत्यांची त्रेधा उडाली.
- संमेलनाच्या मार्गावर महाराष्ट्रातील थोर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत.
- पुरोगामी विचारांच्या लेखकांची पुस्तके मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी स्टॉलवर उपलब्ध आहेत.

सातवे मराठा साहित्य संमेलन , सांगली

मराठीची व्युत्पत्ती संस्कृत, दक्षिण भारतीय भाषांतून नाही - डॉ. प्रतिमा इंगोले
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 14, 2010 AT 12:00 AM (IST)

सांगली (क्षात्रवीर संभाजीराजे नगरी) - मराठी भाषेच्या व्युत्पत्तीचा शोध संस्कृत किंवा दक्षिण भाषेच्या घेण्यातून चुकीचा इतिहास प्रचलित झाला. चुकीचे पायंडे पडत गेले, असे मत सातव्या मराठा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. प्रतिमा इंगोले यांनी व्यक्त केले. शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या परिसरात सुरू झालेल्या या संमेलनाचे उद्‌घाटन उद्योजक शहाजीराव जगदाळे यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, प्राचार्य पी. बी. पाटील, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.

वऱ्हाडी लोकभाषेच्या अभ्यासक डॉ. इंगोले यांनी अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेच्या व्युत्पत्तीबद्दल काही महत्त्वाची विधाने केली. त्या म्हणाल्या, ""मराठी भाषेच्या संशोधनात भाषाशास्त्रज्ञांनी केलेले अनेक घोटाळे निस्तरावे लागत आहेत. "राकट देशा कणखर देशा महाराष्ट्र देशा' असे महाराष्ट्राचे वर्णन असलेल्या महाराष्ट्राचा एका लोकगीतात महाराठ असा उल्लेख आहे. राठ म्हणजे कणखर. हा वऱ्हाडी शब्द आहे. वऱ्हाडीची आद्य पूर्व भाषा देशी होती. तिलाच महाराष्ट्री अथवा अपभ्रंश भाषा असे अभ्यासक म्हणतात. या वरून मराठीची निर्मिती संस्कृतपासून नव्हे तर वऱ्हाडीच्या आद्यभाषेपासून झाली आहे. याचे अनेक पुरावे महानुभव वाङ्‌मयात सापडतात. साहित्यनिर्मितीने भाषेला स्थिरता येते. अनेक शिलालेख व त्यावरील उल्लेखांवरून हेच पुढे येते. मराठीची व्युत्पत्ती सोपी आहे. आमचे भाषापंडित गावाला वळसा घालत तिचे मूळ शोधण्यासाठी तामिळ भाषेकडे जातात. कोणत्याही शब्दाची व्युत्पत्ती संस्कृतमधून शोधतात; कारण त्यांना मराठीची व्युत्पत्ती त्याच भाषेत शोधायची असते. मुळात भाषा आधी आणि नंतर भाषाशास्त्र येते. बोली आधी आधी नंतर प्रमाण भाषा येते. ते मानले नाही तर भाषाशास्त्रच शुद्ध वाटायला लागते. हा प्रकार उलटी गंगा नेण्याचा आहे. आम्ही म्हणू तेच खरे असे बिंबवण्याचा आहे.''

उद्‌घाटक श्री. जगदाळे म्हणाले, ""मी ज्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलो. त्या आणि माझ्या सर्व नातलगांच्या आयुष्याचा मी भौतिक दृष्टीने विचार करतो; तेव्हा मला अनेक फरकाचे मुद्दे आढळतात. विचारांची कास धरली तरच स्वतःमध्ये बदल होतो. जागतिकीकरणाच्या परिस्थितीत आपल्याला ती गती पकडावी लागेल. साहित्य विचारांची प्रक्रिया गतिमान करते, असे आपण मानत असू तर या बदलाचे प्रतिबिंब साहित्यात हवे. आपल्याला ती गती पकडावीच लागेल. इंडिया आणि भारत हा फरक वाढतो आहे. तो दूर करणारा विचार साहित्याने द्यावा. नावेशिवाय पाण्यातला प्रवास नाही; मात्र पाणी नावेत आले तर प्रवासच नाही. याच सूत्राने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेकडे पहायला हवे.''

जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेची भूमिका मांडताना प्रदेशाध्यक्ष साहेबराव खंदारे म्हणाले, ""आम्ही सर्व साहित्यप्रवाहांचे स्वागत करतो. मराठा या शब्दाकडे आम्ही संकुचित भावनेने बघत नाही. विविध जातीसमूहांना त्यांच्या व्यवसायाने जात चिकटली. ती चिकटण्याआधी ते कोण होते? ते मरहट्ट प्रातांत राहत होते. म्हणून ते सारे मराठा होते. हरवत चाललेल्या लोकसंस्कृतीतील अनेक ठेव्यांचे जतन करण्याची परिषदेची भूमिका आहे. संस्कृतीचे भान ठेवण्याचा आणि ध्यान देण्याचा हा प्रयत्न आहे.''

राजारामबापू सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी स्वागत, जगद्‌गुरू तुकोराय साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. निर्मला पाटील यांनी प्रास्ताविक केले. हेमंत धुमाळ यांनी संमेलनाध्यक्षांचा परिचय करून दिला. छत्रपती संभाजीमहाराज (लेखक श्रीमंत कोकाटे), लोकराजे शिवराय, शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, थोडं खाजवा की (पुरुषोत्तम खेडेकर), थर्ड आय (ब्रिगेडियर सुधीर सावंत), कुळवाडी भूषण राजा शिवछत्रपती (सीताराम काकडे), संशोधन बाबूराव टोंगे, माझे बाबा (अप्पासाहेब मगर) या पुस्तकांचे प्रकाशन झाले. सहाव्या संमेलनाचे अध्यक्ष जैमिनी कडू यांनी नव्या अध्यक्षांकडे पदाची सूत्रे दिली.
जिजाऊ गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. मंचावर माजी आमदार एकनाथ साळवे, मोहनराव कदम, महापौर नितीन सावगावे, प्रवीण गायकवाड, जिजाऊ बिग्रेडच्या सीमा ढवळे आदींची उपस्थिती होती. नितीन चव्हाण, अर्चना चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. आर. एस. पवार यांनी आभार मानले. साहित्य परिषदेचे पदाधिकारी अपर्णा खांडेकर, ऋजुता माने, नामदेव भोसले, शुभांगी पाटील, तानाजीराव मोरे, अशोकराव सावंत, बाळासाहेब सावंत, ए. डी. पाटील, प्रदीप सूर्यवंशी, सुभाष सावंत, काका हलवाई, डॉ. संजय पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते संमेलनाच्या संयोजनात व्यस्त आहेत.

क्षणचित्रे
0 शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचा परिसर महापुरुषांच्या प्रतिमांनी सजून गेला आहे.
0संमेलनस्थळी विचारपीठांना क्रांतिसिंह नाना पाटील, महात्मा चार्वाक, महात्मा फुले यांची नावे देण्यात आली आहेत.
0निमंत्रित महिला व पुरुष अशा सर्वांनीच केशरी फेटे परिधान केले होते.
0संमेलनाध्यक्ष प्रतिमा इंगोले यांनी फेट्यासह अध्यक्षीय भाषण वाचून दाखवले.
0जोराच्या पावसामुळे पुस्तक विक्रेत्यांची त्रेधा उडाली.
0संमेलनाच्या मार्गावर महाराष्ट्रातील थोर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत.
0पुरोगामी विचारांच्या लेखकांची पुस्तके मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी स्टॉलवर उपलब्ध आहेत.


खुल्या काव्यसंमेलनात उमटला स्वाभिमान आणि उद्रेक
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 14, 2010 AT 12:00 AM (IST)

सांगली - शब्दा-शब्दांतून जाणवणारा उद्रेक, स्वाभिमान, वास्तवावर बोट ठेवणाऱ्या कविता आणि गुलाबी थंडीत उत्स्फूर्त दाद देणारे रसिक यांमुळे सातव्या मराठा साहित्य संमेलनातील खुले कविसंमेलन रात्री उशिरापर्यंत रंगले. दहा वर्षांच्या मुलीपासून 70 वर्षांच्या ज्येष्ठ कवींनी उत्साहात सहभाग घेतला.
कोल्हापूरच्या कवयित्री मंदा कदम अध्यक्षस्थानी होत्या.

संमेलनात ज्येष्ठ-नवोदित मिळून 65 कवींनी भाग घेतला. विद्रोह, शेती, माती, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, एकात्मता, मानवता, जाती-जातींवरचे राजकारण, भ्रष्टाचार आदी विषयांवर कविता सादर झाल्या. काहींच्या कवितेतून शिवरायांच्या कार्याचा गुणगौरव झाला. काहींनी पोवाडा सादर केला तर प्रेम आणि विनोदी ढंगाच्या काव्यरचनांनी रंगत आणली.

""बाप बाप असतो,
घराचा खांब असतो,
वरवर दिसणाऱ्या पाषणातील,
तो खळाळणारा झरा असतो''
या नितीन माळी यांच्या रचनेस जोरदार दाद मिळाली.

""दोन नंबरच्या धंद्याशिवाय,
सध्या काय चालत नाही,
आता दोन दाबल्याशिवाय
फोनसुद्धा लागत नाही''
ही भानुदास आंबी यांची कविता दाद घेऊन गेली.

अभिजित पाटील यांच्या "मोबाईल' या विनोदी कवितेने खळखळून हसवले.

""अन्यायाने वाकणार नाही,
आभाळाची साथ आहे,
मोडेन; पण वाकणार नाही,
ही मराठ्यांची जात आहे''
ही कविता श्रीधर पाटील यांनी तर

""माणूस आता व्हा रे,
जात नावाची कात टाकूनी,
माणुसकीकडे या रे''
या महेश माने यांच्या कवितेने जाती-जातींमधील राजकारणाचा वेध घेतला.

कविसंमेलनाध्यक्ष मंदा कदम यांनी महाराष्ट्राचा कार्यगौरव व इतिहास सांगणारी तसेच प्रतीकात्मक पाऊस कविता सादर केली.

70 वर्षांच्या ज्येष्ठ कवयित्री गुणवंती हिंगमिरे यांच्या पहाडी आवाजातील शिवरायांच्या पोवाड्यास रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. संमेलनात जुन्नरचे शिवाजी चाळक (दिगंबर), प्रा. दिलीप चौधरी (बराक ओबामा), चंद्रपूरचे प्रशांत गोखरे (शिवधर्म), उस्मानाबादचे विक्रम साठे-पाटील (माय), बबन पालसांडे (शिवराय आजीमाय), रामराव मोडे (शिक्षणाच्या आयचा घो), एकनाथ गायकवाड, सूरज मालकर (कवी), वृषभ आकिवाटे (भय), अण्णासाहेब वाठारे (हुकमी एक्का), किरण शिंदे (माझा प्रश्‍न), शामराव मोरे (वैफल्यग्रस्त) यांच्या कवितांना दाद मिळाली.

सांगली - सातव्या मराठा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचा संपूर्ण परिसर शिवमय झाला आहे. भव्य डिजिटल फलक आणि महापुरुषांच्या प्रतिमांनी संमेलनस्थळाकडे जाणारा मार्ग सजला आहे. मुख्य विचार मंचाजवळच पुस्तकांचे स्टॉल मांडले आहेत.

संपूर्ण संमेलनस्थळाचे "क्षात्रवीर संभाजीराजे नगरी' असे नामकरण करण्यात आले. भाषाप्रभू संभाजीराजांची नव्याने ओळख करून देणारा भव्य पुतळा संमेलनस्थळी उभारण्यात आला आहे. एका हाती तळपती तलवार आणि दुसऱ्या हाती ग्रंथ घेतलेली ही मूर्ती परिसरात पाऊल ठेवताच संमेलनाचे वेगळेपण दाखवून देते. संमेलन मार्गावर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, क्रातिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील अशा विभूतींच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. भगव्या ध्वज व पताका सभोवती लावल्या आहेत.

मुख्य मंचाला क्रांतिसिंह नाना पाटील याचे नाव देण्यात आले आहे. सभागृहाला "चार्वाक' यांचे नाव देण्यात आले आहे.

मुख्य विचारमंचाशेजारी पुस्तकांचे स्टॉल्स सजले आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रभरातील पुरोगामी विचारांच्या प्रकाशन संस्थांचे येथे स्टॉल्स आहे. एरवीच्या ग्रंथप्रदर्शनापेक्षा येथे वेगळेपण हे की अनेक लेखकांनी स्वतःचे स्टॉल्स मांडले आहेत. सकाळपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वाचकांची मोठी गर्दी येथे होती. सुमारे दोन हजारांवर निमंत्रितांची नोंदणी झाल्याचे संयोजकांनी सांगितले.

मुख्य विचारपीठाजवळ दीपमाळ उभी करण्यात आली होती. केळीच्या खुंटावर कच्ची केळी वापरून केलेली ही दीपमाळ कल्पक होती. शेजारीच पुरोगामी विचारांच्या पुस्तकांच्या प्लायवूडमधील प्रतिमा लक्ष वेधून घेत होत्या. कलाविश्‍व महाविद्यालयातील प्रा. लोहार व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. विचारपीठाच्या एका कोपऱ्यात प्लायवूडची दीपमाळ उभारली होती. उद्‌घाटक शहाजीराव जगदाळे यांनी ही इलेक्‍ट्रीक दीपमाळ कळ दाबून प्रज्वलित केली.
शांतिनिकेतनच्या सुंदर परिसरात पाहुण्यांची संयोजकांनी चांगली सरबराई केली होती. सकाळी नास्त्याला शिरा होता. दुपारी पुरी श्रीखंडाचा मेनू होता. मातोश्री बयाबाई कदम यांचे भोजनकक्षाला नावे देण्यात आले आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनी रांगोळी काढून परिसर सजवला होता.

आज संमेलनात :
0 सकाळी 8. : मनोरंजनातून प्रबोधन कार्यक्रम. दुर्ग्या देवर्षी नाटिका, तुकाराम महाराज यांच्या जीवनावर पोवाडा, जिजाऊ यांच्यावर एकपात्री प्रयोग, लावणी.
0 सकाळी 9 . परिसंवाद : "बालकुमारांचे साहित्य : निर्मिती व स्वरूप' अध्यक्ष : डॉ. जे. बी. शिंदे. सहभाग : सुरेश सावंत, दिलीप सोळंकी.
0 दुपारी 12 परिसंवाद : "संत तुकारामांचे कालातीत साहित्य' अध्यक्ष : अशोक राणा. वक्ते : गंगाधर बनबरे.
0 दुपारी 12 वाजता परिसंवाद : लोकसाहित्यातील स्त्री. अध्यक्षा : प्रा. शोभना रैनाक. सहभाग : प्रा. कल्पना नागापुरे, डॉ. निर्मला पाटील.
0 दुपारी 2.30 वाजता प्रकट मुलाखत : प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील. मुलाखतकार : डॉ. मोहन पाटील.
0 दुपारी 4.30. वाजता समारोप सत्र. अध्यक्षीय भाषण : डॉ. प्रतिमा इंगोले. समारोपीय भाषण : मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर. उपस्थिती : गृहमंत्री आर. आर. पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, सुधीर सावंत.
0 स्थळ : छात्रवीर संभाजीराजे साहित्य नगरी (शांतीनिकेतन परिसर)

मराठा संमेलनासाठी क्षात्रवीर संभाजीराजेनगरी सज्ज
सकाळ वृत्तसेवा
Friday, November 12, 2010 AT 12:33 AM (IST)

सांगली - जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने उद्यापासून सुरू होणाऱ्या सातव्या अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनासाठी छात्रवीर संभाजीराजे साहित्यनगरी सज्ज झाली आहे. उद्या (ता. 12) वाटेगाव येथे अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मस्थळापासून साहित्य दिंडीला प्रारंभ होईल.

देशाच्या विविध भागांतून तीन हजारांवर साहित्यरसिक उपस्थित राहतील. संमेलनासाठी उभारलेल्या विचारपीठावर जगद्‌गुरू तुकोबाराय तसेच छत्रपती संभाजीमहाराज यांच्या प्रतिमा असतील. दीड हजार प्रेक्षक बसू शकतील एवढी भव्य बैठक व्यवस्था तसेच साहित्यिक व बाहेरच्या रसिकांसाठी राहणे-भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तीन दिवस रंगणाऱ्या या विचारमंथनात विविध विषयांवर सहा परिसंवाद, दोन कविसंमेलने, बालरसिकांसाठी कार्यक्रम असणार आहेत. रविवारी (ता. 14) सकाळी 9 वाजता जिल्ह्यातील लोककलावंतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. त्यात अंधश्रद्धेवर आधारित "दुर्ग्या देवर्षी' ही नाटिका, तुकोबाराय यांच्या जीवनावर आधारित पोवाडा, लावणी, राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित एकपात्री प्रयोग असे भरगच्च कार्यक्रम आहेत. संमेलनस्थळी दोन भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. रंगीबेरंगी पताकांनी ग्रंथदिंडीच्या मार्गाची सजावट सुरू आहे. 40 बाय 20 फूट आकाराचे भव्य व्यासपीठ सजवण्यात आले आहे. त्यावर तुकाराममहाराज व छत्रपती संभाजीमहाराज यांच्या प्रतिमा आहेत.

संमेलनस्थळी संभाजीमहाराजांच्या 9 फूट उंचीच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण चंद्रपूरचे माजी आमदार एकनाथ साळवे यांच्या हस्ते झाले. भव्य दीपमाळ, कारंज्याने शांतिनिकेतनचा परिसर सजला आहे. उद्या येथे देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या प्रतिनिधी व साहित्यिकांचे आगमन होणार आहे. संमेलनासाठी शहर सज्ज झाले आहे. संमेलनस्थळी मंडप सजावटीची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. साहित्य संमेलनाच्या प्रचारासाठी जिल्हाभर फिरलेल्या प्रचाररथांनी दोन हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. प्रत्येक तालुक्‍यातील गावांत जाऊन तेथे संमेलनाचे स्वरूप व परिवर्तवादी विचारांचा प्रसार करण्यात आला. अनेक ठिकाणी रथांचे स्वागत झाले. दरम्यान, उद्या सकाळी साडेदहा वाजता ग्रंथदिंडीला सुरवात होईल. प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत होणार आहे. दुपारी तीन वाजता दिंडी सांगलीत दाखल होईल. त्या नंतर टिळक चौकातून शिवाजी पुतळ्याला अभिवादन करून दिंडी संमेलनस्थळी येईल. लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

ग्रंथप्रदर्शनाचे 25 स्टॉल सज्ज
संमेलनस्थळाशेजारी असलेल्या जागेत ग्रंथप्रदर्शनासाठी 25 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. परिवर्तनवादी, विद्रोही, बहुजनवादी, दलित साहित्य, अनुवादित प्रकारातील साहित्याचा खजिना वाचकांना उपलब्ध होणार आहे. ग्रंथप्रदर्शन समितीचे बाळासाहेब सावंत म्हणाले, ""संमेलनात दर्दी वाचकांची भूक भागवण्यासाठी विविध प्रकाशनांचे 25 स्टॉल उभारले आहेत. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहूमहाराज, महात्मा जोतिबा फुले यांची समग्र ग्रंथसंपदा असेल. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या सर्व पुस्तकांचा स्टॉल असेल; त्याचबरोबर व्यक्तिमत्त्व विकास, नालंदा प्रकाशन, मराठा सेवा संघ प्रकाशन (उस्मानाबाद), मराठा मार्ग (नागपूर), अक्षता प्रकाशन, निरंकारी सत्संग, जनस्वास्थ्य परिवार यांचे स्टॉल असतील. विविध विचारप्रवाहांवर आधारित साहित्याची हजारो पुस्तके या निमित्ताने रसिकांना उपलब्ध होतील.

नवोदित रंगवणार कविसंमेलन
साहित्य संमेलनात दोन कविसंमेलनांचे आयोजन केले आहे. उद्या (ता. 12) पहिल्या दिवशी कवयित्री मंदा कदम यांच्या अध्यतेखाली खुले कविसंमेलन रंगणार आहे. रात्री साडेआठ वाजता सुरू होणाऱ्या कविसंमेलनात जिल्ह्यातील नवोदित व उपेक्षित कवी आपल्या कवितेने परिवर्तनाची सुरवात करतील. यात अशा जास्तीत जास्त कवींना संधी देण्यात आली आहे. उपेक्षितांची दु:खे ते मांडणार आहेत. कवी किरण शिंदे व शिवाजी दुर्गाडे सूत्रसंचालन करतील.

Monday, November 9, 2009

<span title="Click to correct" class="transl_class" id="0"><span title="Click to correct" class="transl_class" id="0">जळगावमध्ये</span></span> <span title="Click to correct" class="transl_class" id="1"><span title="Click to correct" class="transl_class" id="1">राज्यस्तरीय</span></span> <span title="Click to correct" class="transl_class" id="2"><span title="Click to correct" class="transl_class" id="2">मराठा</span></span> <span title="Click to correct" class="transl_class" id="3"><span title="Click to correct" class="transl_class" id="3">साहित्य</span></span> <span title="Click to correct" class="transl_class" id="4"><span title="Click to correct" class="transl_class" id="4">संमेलन</span></span>
जळगावमध्ये राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलन Print
वार्ताहर / जळगाव
मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराया साहित्य परिषदेतर्फे येथे ३१ ऑक्टोबर तर दोन नोव्हेंबर या कालावधीत सहाव्या राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरचे प्रा. जैमिनी कडू यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष म्हणून खा. ए. टी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाची तयारी सुरू असल्याची माहिती सचिव प्रा. दिलीप चौधरी यांनी दिली आहे.
मराठा बहुजन समाजाचे सांस्कृतिकरण व्हावे, त्यातून अखिल विश्वासातील मानवी जीवन समृद्ध आणि संपन्न व्हावे या विश्वकल्याणाच्या भावनेतून तुकोबाराया साहित्य परिषदेतर्फे जळगाव जिल्हा बँकेच्या सभागृहात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन केंद्राच्या प्रमुख डॉ. ऑम्वेट यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलन स्थळाला ‘क्रांतिवीरांगना कॅप्टन लिला पाटील साहित्य नगरी’ नाव देण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.
३१ ऑक्टोबर रोजी साहित्यदिंडी तसेच नवोदितांचे कवी संमेलन चंद्रपूरचे प्रा. दिलीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. एक नोव्हेंबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ तसेच महापरिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. बहुजन समाजातील १९ प्रमुख प्रतिनिधी आपली भूमिका मांडणार आहेत. सत्यशोधक साहित्याचे डॉ. श्रीराम गुंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. दोन नोव्हेंबर रोजी ‘शिकलेल्यांना अधिक समाजाभिमुख करण्यासाठी आवश्यक साहित्याचा आराखडा’ विषयावर डॉ. शरणकुमार लिंबाळे, रजनी ठाकूर, प्रदिप साळुंखे आणि सहित्यिक शरद पाटील यांची प्रकट मुलाखत तसेच स्त्री साहित्यातील कृषी संवेदना या विषयावर परिसंवाद होईल. संत साहित्यातील धार्मिक व सामाजिक चित्रे या परिसंवादाने संमेलनाचा समारोप होईल. बहुजन साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे